पुणे, - राज्यात टाळेबंदीनंतर आता सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. हॉटेल्स, फूडमॉल्स, रेस्टॉरंट आणि बार यांच्यासाठी परवानगी दिली जाते. पण ग्रंथालये बंदच ठेवल्याने साहित्य वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. त्यात परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये बंद आहेत. आता हॉटेल, बार हे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. राज्यातील ग्रंथालयांचा मात्र आपण विचार केलेला नाही, ही गंभीर बाब आहे.
ग्रंथालये कधी सुरू होणार, याची विचारणा वाचकांकडून सातत्याने होत आहे. ग्रंथालये बंद असल्यामुळे अभ्यासक, संशोधक, वाचक आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. ग्रंथालये बंद असल्यामुळे त्याचा मोठा फटका ग्रंथविक्रीला बसला आहे, त्यामुळे प्रकाशक, ग्रंथवितरक आणि विक्रेते तसेच त्यांच्याशी संबंधित सर्वांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नव्या साहित्याच्या प्रकाशनाला आणि विक्रीला अडचणी येत आहेत. साहित्य व्यवहाराच्यादृष्टीने ही बाब हानीकारक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रकाशक प्रदीप चंपानेरकर म्हणाले, "समाज प्रबोधनासाठी पुस्तके महत्त्वाची असतात. त्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची आहे. ती बंद असल्याने वनसाहित्य समाजासमोर येण्यास खिळ बसली आहे. त्यामुळे ग्रंथालये सुरू झाली पाहिजेत. यातून ग्रंथव्यवहाराला चालना मिळेल."
"दिवाळी दीड महिन्यावर आलेली आहे. शतकाची समृद्ध आणि संपन्न परंपरा असलेले दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. कोरोनाच्या संकटकाळात दिवाळी अंकाची ही समृद्ध आणि संपन्न परंपरा खंडित होऊ नये, यासाठी दिवाळी अंकांच्या संपादकांनी प्रसंगी आर्थिक तोटा सहन करून दिवाळी अंक काढण्याचा निर्धार केलेला आहे. दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामी ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, त्यामुळे ती त्वरित सुरू होणे खूप महत्त्वाचे आहे," असे चंपानेरकर म्हणाले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संकटकाळात समाजमनात दाटून आलेले निराशेचे मळभ दूर करण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकातच आहे. आजवर पुस्तकांनीच समाजाला भरारी घेण्यासाठी आशेचे पंख दिलेले आहेत. पुस्तके ही जीवनावश्यकच आहेत. मानवी जीवनातील हे ग्रंथांचे मोलाचे स्थान लक्षात घेऊन आणि साहित्य व्यवहाराला उभारी मिळावी यासाठी राज्यातील ग्रंथालये त्वरित सुरू करण्याची मागणी या पत्राद्वारे करीत आहोत, आपण त्याचा संवेदनशीलतेने विचार करून त्वरित निर्णय घ्यावी.
- प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष,मसाप)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.